कॉलेज

असे गेलो होतो आपण सारे मिसळूनी ,
दंगा, मजा ,मस्ती अन अभ्यासात बुडुनी

अश्या कश्या आठवणी कॉलेज देवून जाते,
कधी आसू ,आणि  हसू ओठांवरी देते

मन सारे गेले बघ यिथेच गुंतुनी
राहिले ते दिस फ़क़्त ,तुझ्या माझ्या मनी

तुझ्या जगातून आम्ही हरवू का रे ?
काही वर्षांनी पुन्हा आठवू का रे ?



कातरवेळी आम्ही  कधी येवू  मनामध्ये
येयील   का पाणी तेव्हा, तुझ्या डोळ्यामध्ये ?


                                                 -TO ALL  MY  FRIENDS