एक पत्र...




पत्र ... काही वर्षांपूर्वी संदेश पाठ्वाण्यासाठीच एकमात्र साधन म्हणून पत्रांकडे पाहिलं जात होत पण आजकाल मोबाईल , इंटरनेट अशी अनेक माध्यम उपलब्ध आहेत... ह्या पत्रांचा तसा उपयोग प्रेमी लोकांनाच जास्त झाला असावा .. मनातल्या भावना कागदावर उतरवून थेट समोरच्याच्या मनाला भिडवल्या जाव्या ती किमया फ़क़्त पत्रातच असेल किंवा अजूनही आहेच ... पहले प्यार कि पहली चिट्ठी म्हणजे सगळ्यांच्याच आठवणीचा विषय ... म्हणून विचार केला कि एक प्रेम पत्र लिहाव म्हणून ... कुणाला आणि कुठ पाठवायचं आहे ते सध्या तरी माहित नाही , तीच नाव , गाव कशाचीच कल्पना नाही तरी पण तिच्याशी बोलाव, तिला मनातल सार सांगाव म्हणून हा सारा खटाटोप...


 प्रिय अनोळखी (सध्या तरी अनोळखीच आहेस म्हणून ),

 पत्र लिहण्यास कारण कि , फार दिवस तुला भेटण्याची, तुझ्याशी बोलायची इच्छा होती पण तू अजून पर्यंत काही मला भेटली नाहीस आणि मी हि सध्या आयुष्याच्या अश्या टप्प्यावर आहे जिथ भेटणारा प्रत्येक व्यक्ती माझ्याशी "काय मग लग्न कधी ?, कुणी भेटली कि नाही ?” असा प्रश्न विचारतोय आणि यासोबतच "लवकर दोनाचे चार हात होवू दे ” असे आशीर्वाद हि मला मिळायला लागलेत ... बहुतेक तुझ्या बाबतीत हि असच काहीस घडत असाव ... म्हणून तुला हे पत्र लिहून विचारायचं होत कि तू माझ्या आयुष्यात कधी दाखल होणार आहेस ? .. कधी आपली ओळख होईल ?.. तुला हि माझ्यासारखीच भेटायची ओढ लागली असेल ना ?... आजकल आजू बाजूला माणसांचा वेढा असला तरी मी तुझ्या विचारात गुंतलेला असतो , स्वप्नातही तूझा धूसर का होईना पण चेहरा दिसत राहतो ... आता हा धूसर चेहरा कधी स्पष्टपने माझ्या स्वप्नाबरोबरच माझ्या जीवनात हि येणार आहे ते माहित नाही ... पण तू भेटल्यावर तुझ्याशी काय बोलायचं , कस बोलेल, तुझ्यासमोर कसा व्यक्त होईल ह्याचे विचार मनात सारखे घोळत राहतात ... आणि माझी नजर दिसणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यात तुला शोधात राहते, त्यामुळे तुझा शोध घेता घेता मी दुसर्याच कुणाच्या प्रेमात पडलो तर मग काही खर नाही हा .... गम्मत केली... तस काही होणार नाही मला पूर्ण खात्री आहे ती तूच असशील जिची मी आतुरतेने वाट पाहतोय ... बोलायचं तर तुझ्याशी भरपूर आहे पण सार आत्ताच नको भेटशील तेव्हा नक्की बोलू ... वाट पाहतोय तुझी ....

 फ़्क़्त तुझाच
 मी


 -प्रफुल्ल शेंडगे

"ती" एक रात्र



                  रात्रीची २:३० - ३ ची वेळ होती , शहरातल्या एका चौकात एक ट्रेवल  बस येवून थांबली , एक जन त्या बस मधून खाली उतरला तशी बस निघून गेली , साधारण २५-३० वयातला एक तरुण होता , त्याने इकडे तिकडे पहिले , बहुतेक तो रिक्षा मिळते कि नाही याची चाचपणी करत होता , १० मिनिटे तो तिथेच थांबून रिक्षाची वाट पाहत होता पण त्या रस्त्यावर एकही रिक्षा येत नव्हती ... कंटाळून त्याने चालत जायचा निर्णय घेतला , सोबत फ़क़्त खांद्यावर अडकवलेली एक बैग होती , त्या निर्मनुष्य रस्त्यावरून त्याने चालायला सुरुवात केली .. चालताना हि तो एखादी रिक्षा भेटते कि नाही हे पाहत होता ... रस्त्यावरच्या दिव्यांमुळे उजेड पसरला होता .. पण ती निरव शांतात खायला उठत होती ... मधूनच दूरवरून कुठून तरी ऐकू येणाऱ्या कुत्रांच्या  भुंकण्याच्या आवाजाने  अणि गुरुखाच्या शीटटीच्या आवाजाने ती शांताता भंग पाहत होती पण ती हि फ़्क़्त काही सेकांदापुर्तीच ... त्या चालणारया त्याच्या पावलासोबत सोबत चालत होती ती फ़्क़्त त्याची सावली ... त्यावेळी त्याच्या  मनात थोडी अस्वस्थता वाढत चालली होती ..

                      चालत चालत तो एका चौकात येवून पोहचला … तेव्हा त्याला एका गाडीचा आवाज आला म्हणून तो तिथेच थांबला …. वर्तमान पत्राची गाडी होती ती … अगदी सुसाट निघून गेली ती त्याच्या समोरून .. पुन्हा हताश चेहऱ्याने तो परत चालू राहिला … सुमारे १० मिनीट चालल्या नंतर तो  रस्ता ओलांडन्यासाठी  निघाला … का कुणास ठावूक पण तो निर्मनुष्य रस्ता ओलांडताना हि त्याच्या मनात दोन्ही बाजूनी कोणत वाहन येत नाही न याची खात्री करावीशी वाटली …म्हणून त्याने डाव्या बाजूला पहिले आणि मग उजव्या बाजूच्या रस्त्यावरून नजर फिरवली …. दूर पर्यंत एक हि वाहन दृष्टीस पडत नव्हते … म्हणून त्याने पावूल पुढे टाकले … तोच कुणीतरी  ब्रेक दाबल्याचा आवाज आला.... त्याच्या पायाजवळ एका गाडीच चाक थांबल होत ... त्याने झटकन वर पहिले … डोक्यावर जुन्या काळातली टोपी , चेहऱ्यावर पसरलेली पांढरी  दाढी असलेला एक म्हतारा  माणूस एम. ८० गाडी चालवत होता … त्या म्हातार्याला  अचानक पाहून त्याच्या हृदयाची धड धड वाढायला लागली …. तोच त्या गाडीवरच्या म्हातार्याने त्याला विचारल "कुठ जायचं आहे ? सोडू का गाडी वरून ?” त्याचा तो भारदस्त आवाज ऐकून तर भीती आणखीन वाढली …. आणि शहारत्या अंगाला थोडस सावरून त्याने उत्तर दिल " नको ” आणि इतकच बोलून त्यान लगबगीन रस्ता ओलांडला …

          त्याच्या मनात विचारांचं आणि प्रश्नाचं काहूर माजलं … कोण होता हा माणूस , आणि अचानक कुठून आला ? मगाशी तर रस्तावर एक हि गाडी नव्हती मग क्षणार्धात कुठून आला तो … परत मागे वळून पहायची त्याची हिम्मतच होईना … त्याने जसा रस्ता ला तोच रस्त्यावरचे दिवे बंद झाले … सगळी कडे कालाकुटट  अंधार पसरला … तो दचकला … आणि त्याने परत मागे वळून पाहिलं त्या माणसाकडे .. पण त्या तिथ कुणीच नव्हत … ना तो माणूस ना त्याची गाडी … गेला कुठे होता ? आणि गाडीच आवाज हि का नाही आला ? आता मात्र त्याच्या कपाळावर घाम फुटायला लागला  … हात पायाचे तळवे गार पडले होते … काय कराव काहीच काळात नव्हत … उजेडासाठी त्याने खिशातला मोबाइल  काढला … पण तो हि स्वीच ऑफ झालेला … पुढच काहीच दिसेनास झाल  होत … ऐकू येत होता तो वाढलेला कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज …. तो तिथेच थांबून राहिला … मन घट्ट करून …. काहीवेलातच कुत्र्यांचा आवाज शांत झाला … सगळ वातावर पुन्हा एकदा  सुन्न झाल होत … त्याचा श्वास वाढायला लागला होता … आणि त्याच क्षणी त्याच्या कानावर आली एक जोरदार किंचाळी …. फार विचित्र आवाज होता … त्याने कान बंद करून घेतले आणि तो तसाच त्या अंधारात धावत निघाला … काही अंतर पुढे गेल्यावर  पुन्हा रस्त्यावरचे दिवे चालू झाले होते … त्यासोबत त्याच्या पावलांची गती हि मंदावली … तो त्याच्या घराजवळ येवून पोहचला … त्याने लगबगीने खिशातून घराची चावी काढली .. आणि कुलूप उघडून तो घरात शिरला … आणि घरातले दिवे पेटवले … मग वाश बेसिन जवळ जावून तोंडावर पाण्याचा मारा केला … आणि तसाच विचारमग्न होवून बेड वर जावून बसला … बाहेरून येणारा प्रत्येक बारीक आवाज हि त्याच्या काळजाची धड-धड वाढवत होता … त्याने ती पूर्ण रात्र तशीच जागून कशी-बशी घालवली …

पण आज हि प्रत्येक रात्री त्याला ह्या रात्रीची भीती सतावत राहते  … काय आणि का घडल होत  ते त्याला अजूनहि उमजत नव्हत .  


- प्रफुल्ल शेंडगे 

थोड मुलांच्या मनातल

परवा फेसबुक वर एक पोस्ट वाचली , लिहल होत कि "स्त्री म्हणजे शक्ती ... तर पुरुष म्हणजे सहनशक्ती ” वाचून हसायला आल पण दुसर्याच क्षणी विचार आला कि काय चुकीच किंवा हसण्यासारख लिहल होत त्यात  ... खरच होत कि ते रोज आपण पुरुष किती गोष्टी सहन करतो ... सैंडविच  मधल्या टोमेटो सारखी आपली अवस्था असते रोज ... पण कुणाला सांगू हि शकत नाही... 

मनातून किती हि वाटत असेल रडावं तरी रडू शकत नाही ... बाजूचे बोलायला टपलेलेच असतात "काय रे पुरुष सारखा पुरुष  आणि रडतोस काय ?” आणि नाही व्यक्त झालो तरी "ह्याला काही भावनाच नाहीत ... दगडाच्या काळजाचा आहे का ?” अस दुसरी कडून हि बोलल जात ... कात्रीत सापडलेल्या कागदासारखी अवस्था होते ... काही न करता आपण फाटणार हे नक्की असत ...समोरच्यांना का काळत नाही कि आम्ही पण माणस आहोत .. आम्हाला पण भावना आहेत 
  तू मुलगा आहेस तू हे केलच पाहिजे ... हे तुला आलाच पाहिजे असा हट्ट का ? घरातहि तेच आणि बाहेर तर त्याहून बेक्कार परिस्थिती ... मोबाइल  मध्ये डोक घालून बसलो तरी लोक वेगळ्याच नजरेने बघतात ... सभोवाताली पाहत बसलो तरी तेच ... मित्रांच्या ग्रुप  मध्ये बसलो कि म्हणायचं “टवाळकी करतात ”, बाहेर फिरलो कि उनाड्ग्या करतो आणि  घरात बसल तरी “काय घर कोंबड्यासारखा घरात बसतोस ”... कराव तरी  काय आम्ही ?  आणि त्यात सारख मुला- मुलींची होणारी तुलना ...


            दहावी बारावी चे निकाल लागल्यानंतर बातम्या वाचल्यात किंवा पहिल्यात का ?... एकच ठरलेली बातमी ... ह्या वर्षी हि मुलीनी मारली बाजी ... खरच  असेल हि.. पण प्रश्न हा आहे कि त्यांनी आणि आम्ही काय स्पर्धा लावण्यासाठी परीक्षा दिलती का ?  मुली जास्त पास होतात कि मुल हे पाहण्यासठी ... नाही ना मग ? ते जावूद्या कधी कुठल्या परीक्षेत मुल आली अव्वल तर कुणी सांगत का "मुलांनी  मारली बाजी ” ? नाही .. का तर का सांगाव ... मुल आहेत ती, त्यांना यायलाच पाहिजे अव्वल ... म्हणजे आमच कौतुकच नाही ? आता मुलींशी स्वताहून बोललो  तरी वाईट ठरवायचं आणि नाही बोललो तर सरळ आखडू  ठरवून  टाकायचं... फेसबुक  वर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण असो किंवा प्रेमाच प्रपोज  करण सगळ आम्हीच आधी कराव हा ह्यांचा हट्ट .. का त्या का नाही करत हे सगळ स्वतःहून ?  दोन तीन महिन्या पूर्वीचा दिल्लीतला एक प्रसंग किंवा मागच्या वर्षी दोन बहिणीचे कथित आरोप ऐकले का तुम्ही ... त्यांनी मुला विरुध्द केलेले आरोप ... मेडिया ने हि ह्या गोष्टीला खूप उचलल... अगदी झूम करून करून मुलाचे फोटो दाखवत होते ... जे तोंडात येयील ते बोलत होते ... कुठलीच शहानिशा न करता... तपासा अंती ते निर्दोष असल्याच सिद्धह हि झाल .. पण त्या नंतर एका हि माध्यमाने माफी मागितली नाही ... का आमची काहीच इज्जत नसते .. मान्य आहे सगळ्याच मुली अस करत नाहीत .. मग तुम्ही का विसरता कि सगळीच मुलहि अशी नसतील याचा ? 


   " स्त्री दाक्षिन्य " बद्दल माहिती आहे न तुम्हाला .. मग पुरुष दाक्शिन्य का नाही ? स्त्री-पुरुष समानता  आहे ना ? शालेच्या दिवसापासून ते कॉलेज च्या दिवसा पर्यंत आम्ही प्रत्येक शिक्षकांच्या टीकेचे धनि ... मुलिंच्या बऱ्याच चुकिना माफ़ी आणि आमची एक चुक ही घोड़चुक समजली जायची ... तेच ऑफिस मध्ये पण .. उशिरापर्यंत ऑफिस मध्ये थांबण आल की आमचच  मरण... मग कुणी आम्हाला विचारत पण नाही नेहमी आम्ही गृहीत धरलो  जातो... अणि कितीही मनापासून चांगल काम करूनही आम्हाला म्हनाव तेवढ कौतुक पदरात पडत नाहीच .... कौतुका वरुण आठवल ... सोशल नेटवर्क साइट्स वर कोणत्याही  मुलाने एखादी कितीही चांगली पोस्ट किंवा फोटो टाकला तरी कुणी ढून्कुन  ही पाहत नाही ... लाइक अणि कमेंट्स तर फारच दूरची गोष्ट ... पण त्याच जागी कुना एक मुलीने एखादा फोटो टाकला तरी साखरेला लागलेल्या मुंग्या सारखे प्रत्येक जन लाइक , कमेंट्स साठी धडपडत असतो ... अणि हे करणारे पण कोण आमच्या सारखीच मुल , जावुदया काय  बोलणार अजुन ह्यावर  ... काहीही असल तरी आम्ही आमचा प्रत्येक क्षण आनंदाने जगतोय ..जस काही घडलच नसल्या सारख ..बहुतेक हीच असेल आमच्या कड्ची सर्वात मोठी शक्ति...

       


-प्रफुल्ल शेंडगे 

नात विश्वासाच - भाग २

              मुग्धा आणि रोहनला आता मुंबईत येवून ३ महिने झाले होते , मुग्धा हि आता मुंबई च्या वातावरणाशी समरस झाली होती ... रोहनने त्या दिवसाची पुन्हा आठवण किंवा चुकून विषय हि मुग्धा समोर काढला नव्हता  आणि मुग्धा हि मागचा भूतकाळ विसरून संसारात रमली होती .. अगदी सुखी संसार चालला होता दोघांचा .. मुग्धा ने आता नोकरीसाठी सुद्धा धडपड सुरु केली होती , वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखतीला जायला लागली होती , रोहन हि तिच्या ह्या नोकरी शोधण्याच्या कामात तिला मदत करत होता ...

                पुढच्या १० दिवसांनी मुग्धाच्या मावस बहिणीच लग्न होत नागपूरला त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला आणि रोहन ला ४-५ दिवस आधीच या अस निमंत्रण दिल होत ... पण रोहन ला ऑफिस मधून इतकी सुट्टी मिळण कठीण होत म्हणून त्याने मुग्धा च्या आई वडिलांना सांगितल कि त्याला लवकर यायला काही जमणार नाही , पण मुग्धाला आधी पाठवून देतो , माहेरी जायच्या विचाराने मुग्धा खुश झाली होती कारण मुंबई ला आल्यापासून ती अजून माहेरी गेली नव्हती .. दुसर्याच दिवशी रोहन ने मुग्धाच नागपूरला जायच रेल्वे आरक्षण केल ... ठरल्या दिवशी तो तिला रेल्वे स्टेशन वर सोडायला गेला ... नागपूरला घरी पोहचल्यावर माहेरवाशिनीचे लाड पुरवले जात होते .... नवर्याच्या घरी किती हि सुखी असली तरी आई-वडलाना मुलगी माहेरी आल्यावर तिच्या साठी काय करू नि काय नको असच होवून जात तसच मुग्धा च्या घरच्यांचं हि झाल होत ... ऑफिस मध्ये जाताना आणि रात्री जेव्हा रोहन चा फोन यायचा तेव्हा घरातले तिच्या कडे हसून पाहून तिला चिडवायला लागायचे , त्याचं हे चिडवण पाहून मुग्धा अगदी लाजून जायची ... तस मुग्धाच्या मावशीच घर तिच्या घरापाशीच होत त्यामुळे ह्यांच्या घरात हि लग्नाचा पसारा आणि काम चालू होती ... रात्री जेव्हा मुग्धा तिच्या खोलीत झोपायला गेली तेव्हा तिची आई हि तिच्या खोलीत आली ... दोघी जनी गप्पा मारायला लागल्या ... आई तिची विचारपूस करत होती "सगळ बर चाललाय ना मुग्धा , संसार काय म्हणतोय ? , आल्यापासून तुझ्याशी नीट बोलायलाच भेटल नाही बघ ” अस म्हणत ती मुग्धा च्या डोक्यावरून हात फिरवत होती , मुग्धा ने तिच्या प्रश्नाची उत्तर दिली आणि संसाराच्या , मुंबईच्या गोष्टी आईला सांगायला लागली ..पण आई फ़्क़्त तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत होती ...

             लग्नाच्या ह्या गडबडीत एक एक दिवस सरत होता , फ़्क़्त दोन दिवसावर लग्न येवून ठेपल होत म्हणून सगळ्यांची लगबग सुरु झाली होती ... रोहन हि आज नागपूरला लग्नासाठी पोहचणार होता , आईला सांगून मुग्धा चार च्या सुमारास तिच्या एका मैत्रिणीबरोबर बाजारात शॉपिंग ला निघाली , रोहन यायच्या आधी बाजारात जावून येयील अशा हिशोबाने ती निघाली , ऑक्टोबर चे दिवस आणि त्यात नागपूरची गर्मी , अंगाला उन्हाच्या झळा लागत होत्या नुसत्या त्या चार च्या सुमारास ... एक दीड तासाच्या शॉपिंग करून घराजवळच्या चौकात मुग्धाला सोडून तिची मैत्रीण तिच्या घरी निघून गेली ... रस्ता ओलांडण्यासाठी मुग्धा दोन्ही बाजूनी वाहनांच्या येण्या जाण्याचा अंदाज घेत होती तेव्हाच तीच लक्ष गेल ते समोरून येणाऱ्या सुमित कडे ....
                 सुमितला  पाहताच मुग्धा चे चालणारे पाय थबकले ... काळजात धडधड वाढायला लागली होती आणि मनात एक वेगळीच परिस्थिती , ह्या स्थितीत काय कराव हे तिला कळेनास झाल ...
समोरून येणाऱ्या सुमितच हि लक्ष मुग्धा कडे गेल ... अचानक समोर आलेल्या ह्या परीस्थित काय कराव काहीच कळत नव्हत ..दोघांच्या हि नजरेसमोर भूतकाळातल्या गोष्टी एकामागून एक धावत होत्या ... सुमित मुग्धा च्या समोर येवून उभा राहिला ... दोघही फ़्क़्त एकमेकांकडे पाहत उभी होती काही क्षणासाठी , मग सुमितने च बोलायला सुरुवात केली ... “कशी आहेस मुग्धा ?” त्याचे शब्द ऐकून तिचा श्वास काहीसा जोरात सुरु झाला आणि स्वताला सावरत आणि थरारत्या ओठातून शब्द गोळा करून मुग्धा ने त्याला उत्तर दिल "मजेत आहे , तू कसा आहेस ?” त्यावर तो म्हणाला "मी पण मजेत... थोडासा ” फ़्क़्त तोंड ओळख असलेल्या लोकांसारख दोघांच बोलन चालल होत... आणि त्यातच सुमित ने एक प्रश्न विचारला "विसरलीस का मला ?” त्याचा हा प्रश्न ऐकून मुग्धा त्याचेकडे पाहायला लागली आणि तीन उत्तर दिल "हो , प्रयत्न करतेय विसरायचा तुला , माझ्या वर माझ्या पतीने टाकलेल्या विश्वास साठी , आणि त्याच्या प्रेमासाठी ” तीच हे बोलन ऐकून सुमित गालात हसला आणि म्हणाला "तुला पुन्हा कुणाच्या तरी प्रेमात पडलेल पाहून छान वाटल मला , अशीच आनंदात राहा कायम , आता आपल्याला आपापल्या आयुष्यात पुढ गेल पाहिजे , जे नशिबात असत तेच होत असत कदाचित , आणि ते होऊन गेलय आपल्या बाबतीत ” त्याच्या ह्या बोलण्यावर तिने फ़्क़्त मान हलवून उत्तर दिल आणि म्हणाली "मी निघते ” अस म्हणून तीने रस्ता ओलांडला आणि तेव्हा मागून कुणीतरी आवाज दिला "मुग्धा”" .... ओळखीचा आवाज होता , आवाज ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक आनंद पसरला , तिने झटकन मागे वळून पाहिलं तर खरच रोहन आला होता , आत्ताच रिक्षातून उतरला होता .... त्याला पाहून मुग्धा त्याच्या कडे गेली आणि मग दोघेही गप्पा मारत घराच्या दिशेने निघाले .... सुमित हे सार तिथ उभ राहून पाहत होता ... मुग्धाला तिच्या संसारात खुश पाहून तो हि आनंदी झाला होता मनातून ...  
        खरच प्रेम हे असच असत किंवा असाव , समोरच्याच्या आनंदात स्वत आनंदी होण्यासारखं .... आज ती तिघही स्वतःच्या आयुष्यात पुढे चालली होती .. कुणाचा तरी विश्वास आणि प्रेम सांभाळत....

- प्रफुल्ल शेंडगे 

नात विश्वासाचं








मुग्धा , तशी मुळची नागपूरची , चार महिन्यापूर्वीच तीच रोहन सोबत लग्न झाल होत , तसा रोहन हि नागपूरचाच , एका बँकेत कामाला होता , पण दोन आठवड्यापूर्वीच नोकरीत झालेल्या बदलीमुळे मुंबईला आला होता , अर्थात मुंबई दोघांसाठी हि तशी नवीनच होती पण रोहनचा बराचसा वेळ ऑफिस मध्ये जायचा त्यामुळे त्या नवीन शहराच त्याला एवढ वेगळ वाटत नव्हत पण मुग्धा घरीच असायची , त्यात नवीन ठिकाण ,कुणाशी फारशी ओळख हि नव्हती , रोहन ऑफिस ला गेल्यावर थोडा वेळ रोजच्या कामात जायचा मात्र नंतर एकटीला घर खायला उठायच , तशी मुग्धा हि ग्रेजुएट होती , लग्नाच्या आधी ती नागपूर मध्ये एका खाजगी कार्यालयात काम करायची , त्यामुळे तिला त्या एकट्या घरात उदास व्हायला व्हायचं , पण सध्या तरी दुसरा पर्याय नव्हता . दुपारच्या जेवणा नंतर वामकुक्षी घ्यायची आणि रोहन ऑफिस मधून यायच्या वेळे पर्यंत घरातली काम करून घ्यायची म्हणजे तो आल्यावर त्याच्यासोबत बोलायला , फिरायला वेळ मिळायचा , असा जणू दिनक्रमच झाला होता तिचा .

असच एका दिवशी दुपारच्या जेवणानंतर मुग्धा झोपून गेली आणि सुमारे ४:३० च्या दरम्यान झोपेतून उठली , झोपण्याने मनावर थोडी मरगळ आली होती म्हणून तशीच उठून बाल्कनीत जावून बसली , उगाच एकटक पाहत राहिली , आणि ह्या निशब्द कातरवेळी "त्याचा" विचार तिच्या मनात फिरायला लागला , सुमित .... तिच्या कॉलेज चा मित्र , तस दोघांचहि एकमेकांवर प्रेम होत कॉलेज च्या दिवसात , त्याचा चेहरा , त्याच बोलन, त्याची एक-एक आठवण , आज सगळ दाटून आल होत तिच्या मनात , पहिलं प्रेम होत ना तीच ... कॉलेज मध्ये झालेली त्याची आणि तिची पहिली भेट , मग वाढत गेलेली मैत्री आणि फुलत गेलेलं प्रेम ... गुपचूप भेटन सुरु झाल , फिरायला जान , आयुष्यभराच्या शपथा हि घेतल्या जावू लागल्या .. अगदी नजर लागण्यासारखेच दिवस होते ... एक दिवशी मुग्धाच्या घरी तिच्या आणि सुमित च्या प्रेमाबद्दल कुठून तरी समजल आणि मुग्धा वर बंधने आली ... सुमित आणि तिच्या गाठीभेटी कमी होवू लागल्या ... कामाला जायचं हि बंद झाल तीच ... तशी सुमित ने मुग्धा च्या घरी येवून तिच्यासाठी मागणी घातली हि होती पण आपल्या इथल्या बर्याच ठिकाणी जे होत तेच झाल .... जात- धर्म वगैरे पाहन , समाज काय म्हणेल ह्याचा विचार .. ते इथ हि पाहिलं गेल आणि इथ पण त्याचं प्रेम हारल.... आता तर घरच्यांनी मुग्धा च्या लग्नासाठी मुलगा बघण्याची घाई सुरु केली .... मुग्धा तशी समंजस होती .... आई वडिलांचा मान राखण्यासाठी ... तिने सुमित शी बोलन, भेटन बंद केल पण मनातून त्याची आठवण जात नव्हती ... रोज एकांतात रडायची त्याच्या आठवणीने .... आणि एके दिवशी रोहन तिला बघायला आला होता ... त्याला मुग्धा पसंद पडली ... मुग्धा ह्या बघण्याच्या कार्यक्रमात जास्त रस घेत नव्हती ... तिने ठरवलंच होत आता घरचे जे ठरवतील तेच करायचं ...मुग्धा च्या घरच्याना रोहन आवडला होता ... लग्नाची बोलणी झाली आणि ३ महिन्यातच दोघांच लग्न हि झाल ... रोहन हि मनमिळावू , समंजस आणि प्रेमळ होता ... त्याच्या सोबतच्या संसारात मुग्धा रमायला लागली होती ... पण आजच्या ह्या सुमित च्या आठवणीने तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले होते ... तेव्हाच दारावरची बेल वाजली ... आणि मुग्धा तिच्या तंद्रीतून बाहेर आली ... दरवाजा उघडला तेव्हा रोहन आला होता ऑफिस मधून ... त्यान तिच्या कड पाहिलं ...तिच्या चेहर्यावरची उदासिनतात त्याने हेरली होती त्याच्या नजरेत ... पण त्यामागच कारण त्याला उमजल नव्हत ... तो तसाच जावून सोफ्यावर बसला .. तितक्यात मुग्धा ने पाण्याचा ग्लास आणून दिला तेव्हा त्याला तिच्या चेहर्या वर सुकून गेलेल्या अश्रुंचे ओघळ दिसले .. त्याने दोन घोट पाणी पिल आणि मुग्धाशी विचारपूस करायला लागला "काय झाल? अशी उदास का दिसतेस ? “ , मुग्धा ने "काही नाही " अस वरवरच उत्तर दिल पण ह्या उत्तराने त्याच काही समाधान झाल नाही , त्यान हळूच तिचा हात धरून तिला स्वतः शेजारी बसवलं आणि अगदी लाडक्या स्वरात तिच्याशी बोलायला लागला "ओह , रुसलीस कि काय माझ्यावर ? “ पण मुग्धा च्या चेहऱ्यावरचा भाव काही बदलत नव्हत , ती सगळ काही ठीक असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करत होती पण तीच चेहरा मात्र तिची साथ देत नव्हता ... तीच मन तिला खात होत आतून ... एका क्षणी तिला वाटत होत कि सांगून टाकाव रोहन ला तिच्या उदासीच कारण पण मनात भीती पण वाटत होती ...
रोहन तिला खुश करण्याचा मनापासून प्रयत्न करत होता ... आता मात्र मुग्धा नि मनाशी ठामपने ठरवलं सार काही सांगायचं , ति रोहन ला म्हणाली "मला तुम्हाला काही सांगायचं आहे , पण तुम्ही रागावणर नाही ना ?” रोहन च्या चेहऱ्यावर थोडी भीती आणि थोडी उत्सुकता दिसायला लागली , तो म्हणाला "सांग ना , त्यात रागावन्यासारखा काय ”... आणि त्याच हे बोलन ऐकून मुग्धा ने सांगायला सुरवात केली ... तिच्या आणि सुमित च्या भूतकाला बद्दल ... प्रत्येक शब्द सांगताना ती मनातून मोकळी होत होती , इकडे रोहन च्या चेहऱ्यावरचे भाव कळेनासे झाले होते ... एका मागून एक मनातले सारे विचार ती त्याच्या समोर बोलू लागली आणि काही वेळानी सार काही सांगून ती शांत झाली आणि रोहन कडे पाहू लागली , त्याची काय प्रतिक्रिया असेल ह्याचा अंदाज भेण्याचा प्रयत्न करायला लागली ... रोहन ने स्वताला थोडस सावरून टेबलवरचा पाण्याचा ग्लास उचलला आणि एक घोट पाणी पिऊन , एक दीर्घ श्वास स्वतःत भरून हळूच मुग्धाचा हात स्वतःच्या हातात घेवून तिच्याशी बोलायला लागला "आज हि तुझ त्याच्या वर प्रेम आहे ? तुला जायच आहे का त्याच्याकडे ?” त्यावर मुग्धाने उत्तर दिले "नाही हो , मी आत्ता तुम्हालाच माझ सर्वस्व मानल आहे , मी त्याला कधीच मागे सोडून आली आहे , मी तुमच्या सोबत आनंदी आहे ” हे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले होते .. रोहन ने एका हातात तिचा हात धरून दुसर्या हाताने तिच्या गालावरचे अश्रू पुसले आणि तिच्या केसांवरून हळूच हाथ फिरवत म्हणाला " मुग्धा , मला तू आवडतेस , आणि तुला हि मी आवडतोय अस तुझ म्हणन आहे मग का तू स्वताला दोषी मानतेस , जे घडल तो तुझा भूतकाळ होता , पण वर्तमान आणि भविष्यकाळ वेगळा आहे , मी तुझ्या मनाची स्थिती समजू शकतो , आपण आठवणीना तर थांबवू शकत नाही ना, तू स्वताला अपराधी मानन सोडून दे , तू जे आपुलकीने आणि हक्काने माझ्याशी सगळ शेअर केलस ह्यातच आपल नात किती घट्ट आहे ते कळत ” त्याचं ह्या अश्या आशादायी आणि प्रेमळ बोलण्याने तिच्या चेहर्यावरच काहीस टेंशन दूर गेल होत .... आणि आता दोघांच्याही चेहऱ्यावर पुन्हा एक नवी चमक आली होती ... दोघ ही काही क्षण तशीच एकमेकांकडे पाहत बसली आणि संध्याकाली दोघेही बाहेर फिरायला निघून गेली

- प्रफुल्ल शेंडगे .

प्रेम

   



           प्रेमात कोण पडत नाही ? सगळेच पडतात कधी ना कधी . प्रेम, हि अशी दरी आहे जिथ रोज किती जन तरी आनंदाने उड्या मारतात तर किती जन ह्या दरीत पडायला नव्याने तयार होत असतात .तुम्ही कधी पडलात प्रेमात ? काय होत असत हो प्रेमात पडल्यावर नक्की ?

      सिनेमात सांगतात तसच होत का अगदी म्हणजे "रातो कि निंद ओर दिन का चैन " हरवल्यासारख , नजर तिलाच शोधायला लागते , डोळ्यांच्या कोपर्यातून तिला सारख पाहत रहावस वाटत ,प्रेत्येक ठिकाणी तिचाच चेहरा दिसायला लगतो , उगाच येता जाता आरशात पाहत राहतो , केसात हात फिरवून स्वतःशीच हसायला लागतो .. झोप हि गायब होवून जाते तिचा विचार करताना , आणि आलीच जरी झोप तरी त्यात तिचीच स्वप्न आणि तिच्या विषयीची वाढत जाणारी ओढ ..अमीर खान सारख मन हि गायला लागत "पेहला नशा... ", प्रत्येक प्रेम गीत आपल्यासाठीच लिहल गेलय कि काय अस वाटून आपण प्रत्येक गान गुणगुणायला लागतो , तिच्या समोर आलो कि हृदयाची धड धड वाढायला लागते , हातपाय गार पडायला होतात , कपाळावर घाम फुटतो , आणि श्वास हि गरम व्हायला लागतो ... मग प्रेम व्यक्त करताना उडालेली तारांबळ आठवली तरी कित्येकांच्या चेहऱ्यावर आजही हसू उमटत , तर काही जन आज हि प्रेम व्यक्त करण्याच्या भीतीने गारठून जातात.. ...... त्याने -तिने दिलेलं पाहिलं गुलाबच फुल आजही कित्येकांच्या डायरीत प्रेमाची आठवण ताजी करत आहे , आज कल प्रेम पत्रांचे तसे दिवस निघूनच गेलेत , पत्रांची जागा आता मेसेज नि घेतलीय , मग काय दिवसभर कितीही बोललो तरी सारख बोलतच रहावस वाटत , रात्र-दिवस ह्यातला फरक च विसरायला होवून जात बोलताना,खरच प्रेमात पडण म्हणजे एक सुंदर स्वप्नच असत , कधीच ह्या स्वप्नातून बाहेर पडू नये अस वाटत राहत .... प्रेमाच कितीही वर्णन केल तरी कमीच आहे ... वाचून ऐकून थोड्या वेळासाठी प्रेमाची गंमत कळेल हि पण स्वतः प्रेमात पडल्याशिवाय प्रेमाची मजा अनुभवताच येणार नाही हे मात्र नक्की ...मग वाचून हे सार मनाच्या कप्प्यातून आला का कुणाचा चेहरा डोळ्यासमोर ? आलाय ना , अहो किती खुश होताय , बघा तरी किती गुलाबी पसरलीय चेहऱ्यावर तुमच्या त्याच्या / तिच्या फ़्क़्त आठवणीने ...


-प्रफुल्ल शेंड्गे