उन्हाळा

आपल्याकडे साधारणपने तीन ऋतू आहेत - उन्हाळा , पावसाळा आणि हिवाळा .

पाउस आला कि सगळे कसे आनंदित होतात . पाउसाच कितीतरी कौतुक केल जात , त्याच्यावर कविता , लेख , त्याच विलोभनीय वर्णन केल जात . अगदी शाळेतला लहानसा मुलगा हि परीक्षेत "माझा आवडता ऋतू " विचारल कि सरळ "पावसाळा "अस लिहून त्यावर लांबलचक लिहायला लागतो . तसच हिवाळ्याच हि , गुलाबी हवा , अंगावर रोमांच आणणारे थंड वारे , धुक्याची चादर अस खूप काही लिहल जात , बोलल जात . उन्हाळ्या बाबतीत पण लिहन्या सारख खुप काही आहे .हां किंबहुना एकच असा रुतु असावा ज्याच्याबाबतीत आपल्या मनात समिश्र भावना असतील. एकीकडे नको वाटणारा उकाडा, अंगाची लाही लाही करणार उनं... तर दुसरीकडे   शाळेच्या दिवसात मिळनर्या उन्हाळ्या सुट्ट्या तर सर्वाच्यांच आवडीच्या , सुट्टीत मामाच्या गावाला जायची ओढ़, हवेहवेसे वाटणारे खायला भेट्नारे आंबे आणि इतर रानमेवा, झाडाना फुट्नारी नविन पालवी तर मन प्रफुल्लित करुण जाते...अजुन अस खुप काही . असच ह्या उन्हाळ्याचा विचार करायला लागलो होतो , तेव्हा ह्या उन्हाळ्यत प्रामुख्याने जे संमिश्र वातावरण अनुभवयाला मिळ्त त्या विषयी लिहावस वाटल...

तापलेल्या जमीनीला
गरम वाफेच्या भेगा .
चिंब चिंब अंगावर
ओल्या घामाच्या रेघा .

उकडणाऱ्या छताला
लटकलेला मंदावलेला पंखा .
चालू आहे कि बंद ?
मनात सारखी शंका .

घशाला कोरड
अंगाला चटके .
गरम गरम वार्याचे
झोंबणारे फटके .

चिडलेला सूर्य
अन गप्प गप्प झाडी .
तळपत्या रस्त्याला सुखावणारी
गारेगार आईस्कीमची गाडी .

बर्फाचे गोळे
माठातलं पाणी .
उन्हाळ्याची सुट्टी
सोबत ,रानमेव्याची मेजवानी .

आंब्याची फोड
अन शहाळ्यांची साथ .
पोटातल्या आगीला
कलिंगडाची खाप .

कुठे पानगळ
तर कुठे फुले नवी पालवी .
मित्रांसोबतची मारलेली, खोल
विहरितली डुबकी .

नकोशा वाटल्या
जरी ह्या उन्हाळी झळा .
पण पावसाचा गारवा
समजावून सांगे, तो हाच "उन्हाळा "  .

-प्रफुल्ल शेंडगे .

खुप काही

गर्दीत सार्या ह्या चालताना
स्वताची वाट शोधायचीय
अस्तित्व बनवाया स्वताच
जगाकडून खूप काही शिकायचंय

दुखाच्या झळा सोसत
सुखाच्या वनात नाचायचंय
अनुभवावर लिहायला
अजून खूप चेहरे वाचायचेत

जमिनीला स्पर्शून पाय
आभाळाला हात टेकायचेेत
इतक मोठ व्हायला
अजून खूप काही करायचंय

माणसातल माणूसपण जोडून
स्वतातला माणूस घडवायचाय
आणि रोजच्या मरण्यातुन उसंत घेवुन
दोन क्षण "खर" जगून पाहायचंय

-प्रफुल्ल शेंडगे

आनंद

ज्ञान , आनंद ह्या अशा गोष्टी आहेत ज्या एकमेकांशी वाटल्याने वाढत जातात . ज्ञानाच ठीक आहे वाटता येइल पण आनंद कसा वाटायचा ? आनंद हि अशी भावना आहे जी मनातून व्यक्त होते , ते दुसर्याला कस अनुभवायला देवू शकतो आपण ? आपण कस कुणाला आनंदी करू शकतो ?, इतके मोठे थोडीच आहोत आम्ही ? असे अनेक प्रश्न पडले असतील ना तुम्हालाही ?

पण खरच कुनाला आनंदी करण  म्हणाव तेवढ अवघड काम नाहीये . अगदी छोट्या-छोट्या गोष्टीत हि खूप सारा आनंद सामावलेला असतो , फ़्क़्त तो आपल्याला ओळखून समोरच्याला देता आला पाहिजे इतकच . कुणाला आनंदी करायला खूप काही मोठ करायची , महागड काहीतरी द्यायची अशी काही गरज नसतेच कधी ,.कुणाचा तरी वाढदिवस मुद्दाम लक्षात ठेवून त्याला शुभेच्छा देवून पाहा , शाळेतल्या किंवा कॉलेज मधल्या एका मित्राला अनपेक्षित फोन करून त्याच्याशी मनसोक्त बोला , रोज कुणीतरी तुम्हाला न चुकता मेसेज करत असेल तर एकदा तुम्ही त्याच्या आधी त्याला मेसेज करून पाहा , एका लहान मुलाला एखाद चोकलेट देवून पाहा , कुणाची तरी आवड लक्षात ठेवून त्याची आवड आठवणीने त्याला सांगा , त्याची आवड जपा , झाडाखाली एकांतात बसलेल्या आजी-आजोबांशी दोन घटका गप्पा मारा , लहान मुलांच्या सोबत लहान बनून खेळून तरी पाहा, कुणालातरी निश्वार्थी मदत करून पाहा. अशी कितीतरी कारण तुम्हाला अजून भेटतील कुणाच्यातरी चेहऱ्यावर हास्य पसरवायला , अगदीच काही नाही तरी किमान एक छानस स्माईल तर नक्कीच देवू शकता कि . तुमच हे अस अनपेक्षित आनंद देण समोरच्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक , एक वेगळा उत्साह भरून देयील . दोन क्षण का होईना तो त्याच्या डोक्यातले बाकीचे विचार बाजूला सारून तुम्ही दिलेल्या आनंदाबाबतीत नक्कीच विचार करेल ,त्याचबरोर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हालाही एक वेगळीच स्फूर्ती आणि जगण्याचा उत्साह देत राहीलच कि .

शेवटी आपण जे देवू तेच आपल्याला परत कधीतरी नव्याने मिळणार असत . मी तर केलिय सुरुवात , तुम्हीही करताय ना सुरुवात कुणाला तरी उगाच आनंदी करून पाहायची ?

-प्रफुल्ल शेंडगे .

मन मौजी

मन हे मुक्त असत . त्याला जस हव तस ते वागत असत . फुलपाखराप्रमाणे उडत असत . कधी ह्या विचारात अडकून राहत तर दुसर्याच क्षणी दुसर्याच विषयात बुडायला लागत . आपल मन कधी आपल्या ताब्यात नसतच , आपण आपल्या मनाप्रमाने वागतो अस आपण कायम बोलत असलो तरी किती तरी वेळा आपण आपल्याच मनाला मुरड घालत जगत असतो .

किती वाटत असल कि शांत बसून राहावं , स्वतात रमून जाव ,उगाच एकांतात चालत राहाव ,पुस्तक छातीशी कवटाळून डोळे बंद करून खिडकित बसाव , कधी वर टेकडीवर जावून एका झाडाच्या सावलीत निवांत बसाव , त्या टेकडीवरून संपूर्ण शहराला ठेंगण पाहाव , कधी समुद्र किनारच्या वाळूत बसून सूर्यास्त डोळ्यात साठवून घ्यावा , अगदी चांदण्या पाण्यात पडेपर्यंत बघत रहाव , रस्त्यावर चालताना एखाद आवडीच गान कानावर पडल कि वाटत सरळ नाचाव , जोरात गान गाव , स्वताशीच बडबडत राहाव, लहान मुलांसोबत त्यांच्या सारख लहान होवून खेळत राहाव, बालिशपने मित्रांच्या खोड्या काढाव्यात  . अस खूप काही वेगवेगळ करावास वाटत राहत पण बघणारे काय म्हणतील , "वेडा झालाय का ? " अस बोलले तर ? , "त्यापेक्षा नकोच " अस म्हणत आपण ते करण टाळतो .बहुतेक ज्या गोष्टी आपल्याला कराव्याश्या वाटतात पण करता येत नाही त्याला आपल्याच मनातली भीती कारणीभूत असते , कोण काय बोलेल ? , होईल कि नाही? , अस केल तर काय होईल ? अस आपणच स्वताला घाबरवायला लागतो आणि जे आपण म्हणत असतो ना "मनमौजी जगन " ते कुठ तरी दूर पडायला लागत . 


मान्य आहे सगळ्याच गोष्टी जमतीलच अस नाही पण अगदी तसच नाही तरी पण थोड बहुत मनाला आणि स्वताला समाधान वाटेल अस करायला काय जातय?  , अर्थात ज्याचा बाकी कुणाला त्रास होणार नसेल तर . पुन्हा कधीतरी करू अस म्हणत राहिलो तर नंतर -नंतर करता करता सगळच राहून जावू नये म्हणून थोडस खरच मनाला वाटत तस मुक्त जगून पाहायला हरकत काय ?

-प्रफुल्ल शेंडगे .

वधु-परीक्षा की वर-परीक्षा?

"वधू परीक्षा" अर्थात मुलगी बघण्याचा कार्यक्रम. लग्नाच्या आधीचा मानला जाणारा सर्वात महत्वाचा टप्पा. बघण्याचा कार्यक्रम म्हणजे फ़क़्त मुला-मुलींचीच नाही तर त्यांच्या घरच्या मंडळीची , नातेवायकांची भेट, त्यांचे विचार ,स्वभाव ओळखण्याची एक सुरुवात असते . कित्येकांना त्यांचा आयुष्याचा जोडीदार ह्या अशाच बघण्याच्या कार्यक्रमात पहिल्यांदा भेटतो . पण ह्या साऱ्याच वेगळ टेंशन हि असतच . मुलीच्या मनाची स्तिथी , तिला काय वाटत असेल हे आपण वाचून , ऐकून असलाच . पण ह्या बघण्याचा कार्यक्रमात फ़्क़्त मुलीलाच नाही तर मुलालाही पारखल जातच कि मुली कडच्या लोकांकडून . म्हणजेच हि फ़्क़्त "वधू परीक्षा" च नाही तर "वर परीक्षा" पण असतेच . जस मुलींच्या मनात भीती , उत्सुकता असेल तर मुलांच्या पोटात हि भीतीचे फुलपाखर उडत असतीलच कि त्या वेळी .

मुलांच्या हि मनात धाकधूक असते , मुलीला तो पसंत पडेल कि नाही . बघायला जाताना कस तयार होवून जाव इथून सुरुवात होते . लोकांना वाटत मुलाच काय? , एखादी कोणतीही पेंट- शर्ट ची जोडी घातली कि झाल . नाहीच काही तर सरळ जीन्स तर आहेच कि , पण आता काळ बदललाय , मुल हि स्वतच्या दिसण्याकडे जास्तच लक्ष द्यायला लागलीत . मुलगी बघायला जाताना कोणते कपडे घालायचे , साधे फॉर्मल कि आणखी काही . दाढी वाढवून जायचं कि क्लीन शेविंग करून , बूट घालू कि सरळ सैंडल घालाव . सारच कंफ्यूजन ,कुणाला विचारव म्हणून आईला विचारल तर ती एक सांगते , बहिणीला विचार ल तर आणखी एक उत्तर येत , फ्रेंड ला विचारल तर भलतच उत्तर मिळत . गुंता सुटायचा सोडून आणखी वाढत जातो ,त्यात महत्वाचा प्रश्न असतोच "तिला " आवडेल का ? कसातरी एक निर्णय घेवून तयार होतो आणि मुलीच्यांकड़े निघायला लागतो .

रस्त्यात घरातले सारेच मंडळी , उपदेश द्यायला लागतात , हे अस वागायचं , तस वागायचं , स्पष्ट आणि जोराने बोलायचं . त्यांचे उपदेश ऐकत-ऐकत एकदाचे पोहचतो घरा जवळ कि , शेजारचे काही जन रोखून बघायला लागतात , कुजबुज सुरु होते . त्यांची हि कुजबुज ऐकून पोटातल्या फुलपाखराच वाटवाघूळ व्हायला लागत . तसच नजर झुकवून मुलीकडच्या घरच्यांना नमस्कार करत , एकदाच आसनस्थ होतो . पण डोक्यात विचार चक्रासारखे फिरायला लागतात , कपाळावर हलकासा आलेला घाम अलगद रुमालाने पुसायला लागतो , कोरड्या पडलेल्या घशासाठी पाण्याचा ग्लास उचलावा तर आणखी एक प्रश्न , पाणी वरून पिवू कि ग्लास ला तोंड लावून , वरून पिताना अंगावर सांडल तर ?, तोंड लावून पिल तर काय बोलतील हे ?, मग हळूच नजर फिरवायची आणि कुणी बघत नाहीये अस बघून दोन घोट तोंड लावून घटकन पाणी प्यायचं आणि ठेवायचा तो ग्लास टेबलावर एकदाचा . मुलाचे आणि मुलीचे आई वडील बोलन सुरु करतात , आधी इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु असतात , मुलगा मात्र तोपर्यंत नजर थोडी खाली घालूनच गप्प बसलेला असतो ,. मधूनच नजर वर करून इकड तिकड पाहिलं तर एका दुसर्या खोलीतून भिंतीच्या आडून कोणीतरी नातेवाईक चोरून पाहत असतात , थोडा कुजबुजल्याचा आवाज येतो , असा आहे मुलगा -तसा आहे, अस त्याचं न सपष्ट ऐकू येणार बोलन चालू असत . आधीच हृदयाची धडधड वाढलेली असते त्यात ह्या कुजबूजीने आणखी अस्वस्थ व्हायला होत , हाता पायाचे तळवे गार पडतात ,मग हाताचे तळवे एकमेकांवर घासत स्वताला कंट्रोल करायला लागत . तोपर्यंत कुणीतरी बोलत "मुलीला बोलवा ", हा शब्द ऐकला कि विचारत गुंतलेल मन ताडकन जाग होत , बसल्याच ठिकाणी शर्टाचा इन निट केला जातो , चेहऱ्यावरून हात फिरवला जातो , सुकलेल्या ओठांवरून हळूच जीभ फिरवून ओठांचा कोरडेपणा झाकायचा प्रयत्न चालू होतो , त्यातच एक पाय उगाच थरथरायला लागतो , हृदयाचे ठोके तर दुप्पट वेगाने वाजत असतात , कस तरी स्वतला सावरत नजर वर करून पाहायला लागतो तोच किचन मधून साडी नेसलेली , नजर झुकवून , अलगद पावल टाकत , थरथरत्या हातात चहाचा ट्रे घेवून "ती" येते . सगळ्यांच्या नजरा तिच्याकडेच रोखलेल्या असतात , मग एक एक करत सगळ्याना चहा आणि सोबत ठरलेले कांदेपोहे दिले जातात . दोन मिनिट शांतता असते , थोड मनाला बर वाटत असत तोच आणखी एक कुणी तरी बोलत "मुलीला काय विचारायचं आहे ते विचारा ", प्रश्न मुलीला जरी विचारयचे असतात तरी मुलाच्या मनात हि भीती सुरु होते , कॉलेज मधले एक्सटर्नल आणि जॉब इंटरव्यू च्या पेक्षा इथल्या प्रश्न उत्तरांच टेंशन खूपच असत . एक एक करत मुलीला नाव , शिक्षण , आवडी निवडी असे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात , मुलगा मात्र शांत राहून सगळ ऐकत असतो . त्याची अवस्था त्या कसाई वाल्याकड़च्या बोकडासारखी असते , ज्याला माहिती आहे कि पुढचा नंबर त्याचाच आहे . तोच त्याचे आई-वडील बोलतात , तुम्हाला मुलाला काही विचार्याच असेल तर विचारा . आता मात्र हलकीशी अंधारी येते डोळ्यांसमोर , तरी अगदी तयार असल्यासारखा तो चेहऱ्यावर भाव आणायला लागतो . प्रश्न सुरु होतात , उत्तर द्यायच्या आधी आठवायला लागतात ते घरच्यांनी येताना दिलेले उपदेशाचे डोस. घसा थोडासा खाकरत स्पष्ट आवजात उत्तर दिली जातात . प्रश्न संपतात तेव्हा काळ्यापाण्य्च्या शिक्षेवरून सुटल्या सारख वाटत. पण अजून खूप बॉम्ब फुटायचे बाकी असतात , आणि पुढचा बॉम्ब आपल्याच घरातली माणस टाकतात . "तुला काही विचारायचं आहे का मुलीला तर विचार ", त्यावेळी नजरेत किंचितसा राग भरत तो त्याच्या आई वडिलांकडे बघतो आणि मनात विचार करतो , "कधी मुलींशी बोलायचं नाही बोलणारे आज अचानक प्रश्न विचार म्हन्तायेत ,व्वा ". आता विचारल नाही तरी प्रोब्लेम आणि विचारले तरी प्रोब्लेम ,प्रश्न विचारायच्या आधी केबीसी मध्ये अमिताभला बघतात तसे सगळेच नजर रोखून मुलाकडे बघायला लागलेले असतात , धीर करून पहिला प्रश्न विचारला जातो "नाव काय तुझ ?" ह्या प्रश्नासोबत सगळे हसायला लागतात , "अरे मगाशीच सांगितल ना नाव तिने ". स्वताची फजिती झालेली लक्षात आल ना कि गप्पच बसव लागत , ती मान खाली घालुन , हासू आवरत उत्तर देते . मग कुठे जिवात जीव येतो , मग दुसरा प्रश्न , असे एक दोनच वर वरचे प्रश्न विचारून तो गप्प होतो .

मग फ़्क़्त दोघांना गप्पा मारायला बसवलं जात . हे तर आधी पेक्षा अवघड काम असत , पहिल्यांदा कधीच न भेटलेल्याला नक्की काय आणि कस बोलायचं हा प्रश्न दोघानाही पडतो . त्याला वाटत असत ती सुरुवात करेल तिला वाटत तो बोलेल , दोघ हि शांत . भिंती आडून काही नजरा अजूनही बघत असतातच त्याच हि वेगळ दडपण . पण मुलांनीच सुरुवात करायची असा अलिखित नियम ठरवून दिलाय ना , मग तोच एक विषय काढून बोलायला लागतो . ती अजूनही थोडीशी मान झुकवुनच उत्तर देत असते , पायाच्या अंगठ्याने फरशी कोरायला लागते , तिचा अस्वस्थपणा , अवघडलेपणा जाणवायला लागतो . त्याला हि काही सुचत नाही कारण तो पण थोड्या फार फरकाने त्याच अवस्थेतून जात असतो . बोलण्यासाठी वातावरण अनुकूल करायचा प्रयत्न चालू असतो , मुद्दाम छोटासा जोक , तिच्या आवडी-निवडी अस विचारण सुरु होत , ती हि तिच्या कोशातून बाहेर येवून विचारायला सुरुवात करते . पण प्रत्येक प्रश्नाच उत्तर खुप विचारपूर्वक दिल जात ,एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न चालू असतो , पण त्या काही मिनिटात सार काही जाणून घेण शक्यच नसत पण वरवरचा स्वभाव मात्र नक्कीच समजतो . मगापासून साठवलेली भीती काहीशी दूर झालेली असते . मग बघ्ण्याच्या कार्यक्रम आपटून निरोप घेतला जातो तो "विचार करून निर्णय कळवतो " ह्या ठरलेल्या वाक्यातुंच. पण निघताना आता सुटकेचा निश्वास सोडायचा कि होकार / नकाराच टेंशन घेवून जायचं ह्या द्विधा मनस्थित पुन्हा मन अडकत .

पण काही म्हणा , बघण्याच्या ह्या कार्यक्रमात थोडी जास्तच गंमत असते .हो ना ? तुम्हीसुद्धा माझ्यासारखे ह्या बघण्याच्या कार्यक्रमाच्या अनुभवापासून सध्या तरी दूर असाल तर तयार राहा ह्या सार्या गोष्टीना . आणि ज्यांना अनुभव आहे त्यांना आम्ही काय सांगाव ? त्यांच्या डोळ्यासमोर आलेच असतील ते दिवस .

-प्रफुल्ल शेंडगे

ऑफिस

चार भिंतीत हि प्रेम खुलत
दहा नजरा चुकवून हि ,मन कुणासाठी तरी झुलत
समोर असूनही निट बोलता येत नाही
नजेराचा खेळ त्यांचा, त्यांच्याशिवाय कुणालाच कळत नाही

रोज रोज त्याच्यासाठी ख़ास तयार होवून येन
मुद्दाम हातवारे करत नकळत त्याच्या कडे पाहन
लपून छपून "सुंदर दिसतेयस ",अस त्याने हळूच सांगण
मग गालात लाजून तिच , स्वतात गुंतून जान

कामात मग्न तरी , वळून पाहावास वाटण
पाहून त्याला तीच मग मनात खुदकन हसन
कुणी तरी हेरेल म्हणून  किंचितस धडधडन
तरी कारण शोधून त्याच्याशी बोलायला सारख जान

मधुनच मेसेज ला सुरुवात होते
नावाची जागा मग टोपणनाव घेते
विषय नसतो तरी गप्पा रंगल्या जातात
स्माईलीज मधून मनातले इमोशनस धाडले जातात

ब्रेंक मधला वेळ हाच तेवढा खास असतो
कॉफी च्या बहाण्याने तो तिच्या सोबत असतो
सार्यांसमोर दोघ अगदी नॉर्मल वागतात
न बोलून एकमेकांना खूप काही सांगत असतात

ऑफिस सुटण्याची मग जवळ येते वेळ
सुरु होतात मनात हुरहुरीचे खेळ
निरोप घेण्यासाठी त्याचा ,तीच उगाचच थांबण
जाताना "निघते " अस त्याला स्पेशल सांगून जान

-प्रफुल्ल शेंडगे