हेवा

                 


                     "नशीब चांगल आहे यार त्याच , मस्त नोकरी आहे त्याला ,  पगार ही गलेगठ्ठ, मला ही असा पगार मिळायला पाहिजे  , गाडी बघितली का त्याची, नाहीतर माझी "खटारा" , घर पण मस्तच आहे ..नाही तर मि राहतोय आज ही खुराड्यात  " .....काय विचारताय   कोण बोलतय हे सार आणि कुणाबद्दल ? अहो , तुम्हीच बोलताय कि , तुम्ही म्हणजे अगदी तुम्ही नाही आपण सारेच ह्या पंगतीत येतो ... आपण किती दु:खी आणि आपल्याकडे काय-काय नाही आणि दुसर्याकडे किती सुख आहे ह्याची बाराखडी आपण रोजच गात असतो .देवाने- नियतीने  सारी दु:ख , हाल अपेष्टा आपल्याच पदरात टाकल्या सारखी आपली ओरड चालू असते ...माझ्या कडे 'हे' असल असत तर ... अस झाल असत ...आणि 'ते' असल असत तर मी ही 'तस' करून दाखवलं असत... आपल्यालाला ना दुसर्यांचा हेवा करायची सवय लागलीय , आपल्याला कितीही आणि काहींही मिळाल तरी आपण मात्र समाधानी काही होत नाही कारण आपल्याला जे मिळालय त्यापेक्षा दोन थेंब का होईना दुसर्याकडे जास्त असतचं आणि  आपण फ़्क़्त त्याचाच विचार करत राहतो पण आपल्या पेक्षा दोन थेंब कमी मिळालेल्या कडे आपण साफ दुर्लक्ष करत असतो , आपल्याला कुणापेक्षा तरी जास्त मिळालय  ह्याचा विचार आणि जे काही मिळालंय त्यात सुख मानन सोडूनच दिलय आपण . ५ हजाराच्या ही नोकरीतही  जे भागत होत ते आज २०-३० हाजाराच्या नोकर्या करूनही पूर्ण होत नाही , आपल त्यात भागत नाही . ह्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या वाढत चालेल्या गरजा आणि हाव .  2 चाकी गाडी आली कि वेध लागतात 4 चाकीचे , 1BHK रूम असली तरी कुणाकडे तरी आपण 2BHK रूम पाहतो आणि आपल्या ही मनात मोठ्या घराची हाव वाढायला लागते ..अशा अजून कित्येक सार्या गोष्टी आहेत माणसागणिक त्या बदलत जातात इतकचं .
कधी कधी वाटत माणसाला स्वताला  काय मिळाल नाही ह्याच दु:ख मुळात नसतच कधी , पण जे आपल्याला हव असत ते दुसर्या कुणाला तरी मिळालय ह्याचा विचारच त्याला जास्त त्रास देत असतो .

                              आता तुम्ही म्हणत असाल ...असा विचार करणं काय चुकीच आहे का ? मोठी स्वप्न बघन पाप आहे का ? आम्ही आमची प्रगती करू नये का ? नाही..नाही माझ तस अजिबात म्हणन नाही . स्वप्न बघन , विचार करण हा आपला अधिकारच आहे .पण फ़्क़्त विचार करून , दुसर्याचा हेवा , इर्षा करून आपली प्रगती थोडीच का होणार आहे ?, आपल्याला जे समोरच्याकडे  दिसतंय ते मिळवण्यासाठी समोरच्याने किती मेहनत , कष्ट केली असतील ह्याचा आपण कधी विचार करतो का ? नाही ना ? आपण तेवढ कष्ट करायला तयार आहोत  का ? ह्याचा कधी विचार केलाय का ? अहो ,नविन काही मिळवण्यात काहीच गैर नाही पण जे आपल्याकडे कडे आहे ते ही कित्येकाकडे नाही ते ही विसरून कस चालेल , म्हणून म्हणतोय आपल्याकडे आहे त्यात समाधान मानून जगल तर आपल्यासारखेच सुखी बहुतेक आपणच होवू... म्हणून काही नविन मिळवण्याची धडपड मात्र सोडू नका..प्रामाणिक प्रयत्न करा ,कष्ट करा..तुम्हाल जे हवं आहे ते सारं मिळेल फ़्क़्त मनात जिद्द आणि संयम तेवढा ठेवा .

-प्रफुल्ल शेंडगे .

सिनेमा

काय रे ह्या आठवड्यात कोणता पिक्चर आलाय? अमुक हीरोचा ,तमुक हिरोईन चा सिनेमा कधी येणार आहे? काय मस्त होता ना सिनेमा, काय अभिनय केलाय, एक नंबर कथा होती....असे संवाद नेहमीचे झालेत. काही वर्षांपूर्वी सिनेमाला भारतात सुरुवात झाली आणि म्हणता म्हणता सिनेमानि आपल्या मनावर गारुड घातल...पौराणिक,घरगुती,रोमांटिक, हौरर अश्या अनेक साच्यातले सिनेमा बनत राहिले किंबहुना आज हि बनतायेत , काही वर्षां पासून सामजिक प्रश्नांवर भाष्य करणारे, आपल्या आजुबाजुला घड्नारे प्रसंग ,गोष्टीचा सिनेमाच्या कथेत प्रवेश झालाय. सिनेमातली कथा, त्यात दाखवले जाणारे प्रसंग आपल्याला आपल्याच जगण्याचे भाग वाटायला लागले...कधी कधी आपलही आयुष्य असच फ़िल्मी असाव ....सगळ चांगल व्हाह, सिनेमातल्या हीरो-हिरोइन सारख आपल आयुष्य असाव अस वाटायला लागल ...मग त्यांच्या दिसन्याची,वागण्याची कॉपी करन सुरु झाल...अगदी हेअरस्टाइल पासून ड्रेसिंग स्टाइल पर्यन्त सगळ कॉपी ...
सलमान सारखी बॉडी, रणवीर सारखा लुक , करीना सारखी झिरो फिगर ,शाहरुख सारखा रोमांटिक पणा, अस एक ना एक सुरु असतच नेहमी आपल.पण आजकल आपन फक्त सिनेमालाच आपल आयुष्य आणि जग मानत चाललो आहे...जगात घडणार्या गोष्टीना आम्ही फक्त सिनेमातच पाहतोय आणि जगतोय...आता पाहा ना सैराट सारखा सिनेमा येतो तेव्हा आम्हाला औनर किलिंग बद्दल ची दाहकता कळालि, तिहि फक्त त्या सिनेमा पुरती मर्यादित...सिनेमातल्या हीरो-हिरोइन ची अवस्था पाहून अनेकांच्या डोळ्याना पाण्याची धार लागली, अनेकांची मन अस्वस्थ झाली होती, न्यूज़, फेसबुक सारख्या सोशल मीडिया वर आपन किती अस्वस्थ झालो होतो ते आपण सार्यानिच पोस्ट केलि असेल...पण हेच जर आपल्या आजूबाजुला खरखुर घडल तर आपन सरळ सरळ डोळेझांक करतो...फँड्री सारखा सिनेमा जातिव्यवस्था दाखवतो,उड़ता पंजाब सारखा तरुनायित वाढत चाललेल्या व्यसनावर प्रकाश टाकतो, मिल्खा सिंग, मेरी कोम,पानासिंग तोमर सारखे खेळाडु आपल्याला माहिती ही नव्हते ते ही आपल्याला सिनेमानीच दाखवले ...नट सम्राट, बाग़बाण सारखा सिनेमा येतो तेव्हा आई वडिलांच दुःख समजत ,स्लम डॉग मिलेनिअर सारखा सिनेमा झोपड़पट्टीत राह्नार्यांची अवस्था दाखवतो आणि आपन वर वरची हळ्हळ व्यक्त करतो पण समोर एखादा भुकेला जिव आला तर आम्ही नजरा फिरवून घेतो.का करतो आपन अस? कारण आपन ह्या सार्या विषयाना फक्त सिनेमा पुरत त्या अडिज-तिन तासांपुरता मर्यादित ठेवलय..
...हो ना?  सिनेमा चालु आसेपर्यन्त किंवा पुढचे काही तास, दिवस आमच्यात जोश येतो आणि त्यानंतर मात्र आपन सार विसरून जातोय, पुन्हा आपण थंडगार....वाट पाहत राहतो नव्या आठवड्याची ....सोबत येणार्य नव्या सिनेमाची...

-प्रफ़ुल्ल शेंड्गे