जगाचा बाप

मनाशीच आपल्या भांडून तो रोजच कुढत- कुढत जगात होता ,
पण आज मात्र "आप " ल्याच माणसांसमोर जगाचा बाप लटकून मरत होता

कधी नव्हे तो देह त्याचा मेडिया चे footage बनला होता ,
कारण जगण्याने नाही, तर मरणाने त्याच्या , "त्यांना" TRP मिळत होता

त्याच्या कथित हक्कांसाठी ' ते ' स्वतःचे इमले बांधत गेले ,
पण पायाखाली 'त्यांच्या ' कितीतरी चिरडून मेले होते

आता पुन्हा मातीत ह्या नवा पोशिंदा जन्माला येणार नव्हता  ,
कारण आपल्याच माणसांसमोर जगाचा बाप मरून गेला होता .
कारण आपल्याच माणसांसमोर जगाचा बाप मरून गेला होता .

---------  प्रफुल्ल शेंडगे

आजादी की मांग



आजादी मांग रही है ,आजादी मांग रही है
देश की मिटटी मेरी आज भी आजादी मांग रही है |

खून में लथपथ हिमालय की चोटी,
चींख चींख कर शांति मांग रही है |
भूक से तड़फती एक जान
एक रोटी मांग रही है |
देश की मिटटी मेरी आज भी आजादी मांग रही है |

मजदूरी की भुल्भुलाय्या में फसा,“छोटू ”
अपना बचपन मांग रहा है |
घर की लक्ष्मी, बेटी
खुदकी जान मांग रही है |
68 साल के आजाद देश की मिटटी मेरी ,आजादी मांग रही है |
By-----प्रफुल्ल शेंडगे

अनोळखी मन

अनोळखी मन माझे , कधी तुझ्यात गुंतले
नाव जेव्हा तुझे , माझ्या हाती रंगले

अक्षतांच्या ह्या चिंब पावसात , नाव्हून गेले मी
जन्मो जन्मी च्या गाठीत तुजसवे बांधून गेले मी

शहारून जाई हृदयाला , तुझ्या सहवासाचा स्पर्श
तुझ्यासोब्तीच्या प्रत्येक क्षणात , दाटून येई हर्ष

आवाज तुझ्या हळुवार प्रेमाचा , माझ्या अंतरंगी घुमला
तुझ्या माझ्या स्वप्नातला , आपला संसार थाटला

काय अनोखी जादू  तुझ्या नजरेत, अजूनही नाही मज उमगले   !
बघताक्षणी पुन्हा पुन्हा तुला, तुझ्यातच हरवून का  दंगले ?

अर्धांगिनी जरी मी  तुझी ....तू प्राण  माझा पूर्ण  झालास
आयुष्याच्या सांजवेळीचा तूच माझा आधार झालास

स्वप्नातला माझ्या तू , राजकुमार होवून गेलास
सांग ना रे , मी तुझी  आणि तू कधी माझा होवून गेलास ???....
मी तुझी  आणि तू फ़क़्त माझा होवून गेलास !!!!!....


By--प्रफुल्ल शेंडगे .

मुलाकात

वो मिली , हम मिले
मुलाकात तो रोज जैसे ही थी
पर क्यों न समज पाया मैं
वो मुलाकात कुछ और ही थी

नजरो में प्यार भी वही था
आँखों में भी कुछ   नमी थी
पर चहरे पर छलक्नी वाली ख़ुशी
जाने कहा  गयी थी ?

आंसू का सैलाब लेके
जोरे से वो मुझसे लिपट गयी
सहर उठा मन भी मेरा
जाने कौन सी बात दिल पे मेरे लगी थी ?

संभल कर खुदको उसने
हाथ हमारा थाम लिया
पर कुछ कदम साथ चलकर , उसने ये  क्यों कहा की  ...
इस जन्म का आपका -हमरा सफ़र पूरा हुवा |

सवाल मन में मेरे हजारो थे
बाते अनकही तो लाखो थी
पर क्यों न जान पाया मैं
वही  मुलाकात हमारी आखरी थी |

By :-प्रफुल्ल शेंडगे
गुंतले मन कधी सुटले ,
गुंफलेले ह्रदय हे कधी तुटले ,
कळाल तर हेही नाही मला ,
का सोडून गेलीस तू माझी साथ
आठवतो तो फक्त ,निसटत जाणारा , पावसातला  तुझा ओला चिंब हात .......


विचारांच्या डोहात बुडालो ,
एकटेपणा च्या आहारी ही मिळालो ,
नैराश्याच्या ओलांडून खाच-खळगा
शोधायची होती मला ही नवी वाट
पण नजरेसमोर पसरलय चोहिकडे फक्त
तुझ्या आठवणीच धुकं दाट


रणरणत्या विचारात चालताना,
स्वतःच्याच  सावलीशी तोंड झाकताना ,
तुझ्या आसवांचा पानवठा दिसला
तेव्हा उमजल मला ,
तुही माझ्याच शोधात  होतीस...
येवढ होत प्रेम तर का मला सोडून गेली होतीस ??
सांग ना , का मला सोडून गेली होतीस ??

------प्रफुल्ल शेंडगे

पाण्याचं सीमोलंघन आणि तिसर महायुद्ध

पाण्याचं सीमोलंघन  आणि तिसर महायुद्ध

                              शीर्षक वाचून मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील ना ? काय अर्थ आहे ह्या शीर्षकाचा ?हो पण हे खर आहे ! मागच्या काही दिवसातल्या घटना पाहता  हेच म्हणण योग्य आहे . आज दसरा म्हणजे  सीमोलंघन करायचा दिवस .ह्या वर्षी पाऊस  म्हणावा तेवढा झाला नाही . धरण  सुद्धा कोरडी पडायला लागली आहेत. आणि त्यामुळे भंडार दऱ्या तून पाणी जायकवाडी ला सोडायचा निर्णय घेण्यात आला .
दोन दिवसापूर्वी सोडलेले पाणी कदाचित दसऱ्याच्या शुभ दिनी  सीमोलंघन करून जायकवाडी ला पोहचेल सुद्धा
आणि तिथल्या जनतेला थोडा तरी आधार मिळेल . पण वरून जरी पाण्याचा प्रश्न सुटला आहे अस वाटत असलं  तरी ,प्रश्न आत्ता कुठ निर्माण झालेत हे मात्र तितकचं खर .  भंडार दऱ्या तून पाणी सोडण्यावरून तेथील जनतेने केलेला विरोध पाहता पाण्याचा हा प्रश्न भलताच पेटणार आहे अस वाटायला लागलं आहे .
आत्ता पर्यंत ज्याची केवळ शक्यता वाटत होती ती गोष्ट म्हणजे - तिसर महायुद्ध पाण्यासाठी होईल अस वाटत होत , त्या गोष्टीची सुरवात बहुतेक सुरु झाली आहे महाराष्ट्रातल्या ह्या "पाणी "पतान  . पण हि तर
सुरवात झाली आहे आणि त्याच्या झळा सुद्धा लागायला लागल्या आहेत .
                             आता हे झाले से प्रश्न . प्रश्न वाचून आणि भविष्यातल्या ह्या गोष्टीचा परिणाम ह्यांचा विचार करायला गेलं तर मेंदूच पाणी वव्हायला लागेल . इतका हा प्रस्न बिकट व्हायला सुरवात झली आहे .
पण जसे प्रश्न आहेत तशी उत्तरं पण आहेतच कि --त्यातला एक तात्पुरता विचार करायचा म्हटला तर एका दुष्काळी भागाला  पाणी देण्या वरून जो विरोध होतो आहे तो कमी , कमी म्हणण्यापेक्षा बंद झाला पाहिजे .
पण काही झाल तरी स्वताची भरलेली घागर कुणी दुसर्याला दयायला कसा बारा तयार होईल (तहानलेल्याला पाणी द्यावं हि आता आपली जुनी संस्कृती झाली आहे , कोण करतच नाही तो  विचार ). म्हणून काही तरी ठोस उपाय योजना करायला हवी आहे . आणि ह्यावर कायमचा ठोस उपाय म्हणजे "नद्या -जोड प्रकल्प ".
                             ज्या विषयावर वर्षानुवर्षे केवळ चर्चा झाल्या त्या विषयाची पूर्तता करण्याची वेळ सुरु झाली आहे . नाहीतर ह्यापुढे आणखी पाणी पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि आपण पण किती दिवस सरकारच्या नावानी बोट मोडत बसणार आहोत ,किती दिवस दुष्काळी package  साठी आंदोलनं  आणि पाण्यासाठी "हंडा " मोर्चा ह्यासारखे फ़क़्त मोर्चे काढत राहणार आहोत ? त्यापेक्षा ह्या "नद्या जोड प्रकल्पा " विषयी आवाज उठवणार आहोत? ह्या प्रकल्प मुळे देशातल्या साऱ्या नद्या एकमेकींशी जोडल्या जातील. आणि त्यामुळे बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा उपयोग एका विशिष्ट प्रांता साठी न होता सार्या देशाला किंबहुना दुष्काळी भागाला होऊ शकतो.तेव्हा ह्या अश्या प्रकल्पांना विरोध न करता त्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे .
नाहीतर तो दिवस दूर नाही ज्यादिवशी पाण्यासाठी आपण एक्मेंकांच्या जीवावर उठू. म्हणून म्हणतो जागे व्हा
आणि पुन्हा बनवा आपल्या ह्या भारत भूमीला "सुजलाम -सुफलाम ". आणि सारी भांडण  विसरून करूया पुन्हा एकदा  "सीमोलंघन"

-----------------------------------------------------------------------------------प्रफुल्ल शेंडगे 

शायरी

दुनिया के  भीड़  में  हम ,
इसलिए  नहीं  भागते
क्योंकि ,डर लगता  है  कही
हात तुम्हारा, हमसे छुट ना जाये !!

-प्रफुल्ल शेंडगे 

पुणेरी "पाट्या" ते पुणेरी "पार्ट्या"

पुण्यनगरी  म्हणून ओळख असलेल शहर म्हंजे  पुणे .

पुणे !! असं म्हटलं की लागलीच डोळ्यासमोर उभ राहत ते पुण्याचा  वैभवशाली इतिहास , तिथली माणस पुण्याबद्दल (जास्तच )अभिमान असलेली, तिथला शनिवारवाडा ,सिंहगड  इ.,त्याच बरोबर तिथली संस्कृती , आणि आणखी एक महत्वाच म्हणजे "पाट्या " खास पुणेरी शैलीतल्या .
पुण्यातल्या ह्या इरसाल पाट्या म्हणजे पुणेकरांचा अभिमान च आहे .  अगदी मोजक्या शब्दात समोरच्याला काहीतरी शिकवणाऱ्या त्या पाट्या ! अगदी घराच्या दरवाज्यापासून ते five स्टार हॉटेल च्या बाहेर हि दिसून येतात ह्या पुणेरी पाट्या .

पण आजकालच्या काही वर्षात पुण्याच्या ह्या "पाट्या" पेक्षा  पुणे " पार्ट्या " मुळे  ओळखू लागलं आहे .
विद्येचे माहेरघर असणार्या ह्या पुण्यात अनेक विद्यार्थी पुण्यात शिकायला येतात . त्यांच्यात असतो तारुण्याचा तो सळसळता उत्साह . आणि मग सर काही विसरून सुरु होतात त्या "ओल्या पार्ट्या ", कधी सिंहगडाच्या पायथ्याशी , तर कधी एखाद्या हॉटेलात . हे सार काही विशी -पंच्विशित्लीच मुल मुली करताहेत अस हि नाही तर ८वी , १०वी मधली मुल हि करू लागली आहेत आणि त्यांच्या विरुद्ध तक्रार करत कोण तर त्या मुला मुलींची पालकच . केवढी हि भीषण अवस्था . हाच का तो आपला पुरोगामीपणा ? लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य पूर्व काळात लोकांनी एकत्र याव ह्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केले , आणि आजकाल एकत्र येण्यासाठी "पार्ट्या " कराव्या लागतात . पण काय होत ह्यातून साध्य ?  कसली होते विचारांची देवाण -घेवाण . हे सार  चित्र काही एकट्या पुण्यातलं नाही तर साऱ्या छोट्या -मोठ्या शहरा मध्ये सुरु आहे . का होत असेल अस .. विचार करा  उत्तर आपोआपच मिळेल ..कारण सुरुवात स्वतः पासूनच होते .

                                                                                                           -प्रफुल्ल शेंडगे



ALL -IS -WELL ???

रोजच वाहतात इथे पाट आमच्या रक्ताचे
दाही दिशी हि मिळत नाही पाणी दोन थेंबाचे

स्वतःच्या भाकरीसाठी करावा लागतो जागर
उपाशी पोटी द्यावी लागते पोट भर ढेकर

चार भिंती उभारल्या पण त्याला मिळेना छप्पर
असल्या फाटक्या नशिबाचे कुणावर फोडावे खापर

अर्धी नेली माणस आमची swine -flue च्या साथीन
शिंगरू मरतंय आमचं पाठीवरच्या ओझ्यान

आमचाच पैसा तो, धावतोय  "त्या "गोऱ्यांच्या  खिशात
आम्ही मात्र आजही जगतोय काळोखाच्या वेषात

विस्कटलेल्या आयुष्यात कशाचाच बसेना मेळ
तरी जो-तो म्हणतोय     ALL     IS     WELL


                                                              -प्रफुल्ल शेंडगे .

कॉलेज

असे गेलो होतो आपण सारे मिसळूनी ,
दंगा, मजा ,मस्ती अन अभ्यासात बुडुनी

अश्या कश्या आठवणी कॉलेज देवून जाते,
कधी आसू ,आणि  हसू ओठांवरी देते

मन सारे गेले बघ यिथेच गुंतुनी
राहिले ते दिस फ़क़्त ,तुझ्या माझ्या मनी

तुझ्या जगातून आम्ही हरवू का रे ?
काही वर्षांनी पुन्हा आठवू का रे ?



कातरवेळी आम्ही  कधी येवू  मनामध्ये
येयील   का पाणी तेव्हा, तुझ्या डोळ्यामध्ये ?


                                                 -TO ALL  MY  FRIENDS