म्हैसूर च्या वाटेवर ....

            काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे , मी इंजिनीरिंग च्या अंतिम वर्षात असतानाची , कॉलेज च्या इंडस्ट्रियल विजिट कम पिकनिक साठी आम्ही बंगलोर, म्हैसूर अणि उटी ला गेलो होतो ... त्या विजिट मधल्या दिवसांच्या आठवणी तर खुप सार्या आहेत पण त्यातलीच विजिट च्या शेवटच्या दिवशीची आठवण थोड़ी जास्तच लक्षात राहण्या सारखी होती ...

          उटी वरून आम्ही म्हैसूर ला रात्री किमान ०९:०० च्या सुमारास हॉटेल वर पोहचलो , जेवणाला अवकाश असल्याने हॉटेल रूम वर जावून फ्रेश होवून आमचा ५ जणांचा ग्रुप एक रपेट मारण्यासाठी निघाला , हॉटेल च्या त्या रस्त्यावर त्या वेळी म्हणावी तेवढी वर्दळ नव्हती , मजा मस्ती करत आम्ही म्हैसूर च्या त्या अनोळखी रस्त्यावरून चालत निघालो , प्रवासा वरून आल्याने पोटात थोडी भूक वाढली होती म्हणून आम्ही खाण्यासाठी काही भेटत काय ह्याचा शोध घ्यायला लागलो , थोड पुढ गेल्यावर फुटपाथ वर भेल,पाणी-पुरीची एक गाडी दिसली , सगळ्यांनाच भूक लागल्याने आम्ही पटापट स्वतःसाठीच्या ऑर्डर्स दिल्या , मनात उत्सुकता होती कि म्हैसूर मधली हि पाणी-पुरी,भेल ची चव आपल्या इथल्या सारखीच असेल का ह्याची ... शेवटी जेव्हा त्या पाणी पुरी वाल्याने आमच्या आमच्या खाण्याच्या प्लेट्स आमच्या हातात दिल्या ती खावून मात्र थोडा हिरमोडच झाला .... अगदी जिभेवरची चवच गेल्याचा अनुभव आला ..सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते त्याक्षणी ... कशीबशी आम्ही ती संपवली आणि ह्या हरवलेल्या जिभेच्या चवीला परत आणण्यासाठी आणखी थोडी पायपीट सुरु केली , काही अंतरावर पिझ्झा स्टोर दिसला आणि आम्ही सार्यांनी आमचा मोर्चा तिकडे वळवला , एक पिझ्झा आणि त्या एका कोल्ड्रिंक च्या बाटलीवर आम्ही अगदी तुटण पडलो , पण आता टाइमपास साठी काय करायचं म्हणून त्या रिकाम्या बाटलीचा उपयोग करून ट्रूथ अणि डेअर खेळाला सुरुवात केली , ज्याच्याकडे बाटलीच तोंड असेल त्यांनी बाकीच्यांनी सांगितलेलं काम करायचं किंवा विचारलेल्या प्रश्नच खर खर उत्तर द्यायचं ,खरंच मनातल सार गुपित काढून घ्यायला तर हे सारे मित्र मंडळी आधीच टपलेले असतात आणि त्यात असल्या खेळामुळे तर त्यांना आयतीच संधी मिळत होती , तसही कुठल्या हि मित्रांचा ग्रुप जमला न कि त्यात्त होणारी मजा, मस्ती वेगळीच असते , आमच्या ह्या मस्तीने आणि हसण्याच्या आवाजाने ते पिझ्झा स्टोर दुमदुमत होत , पण आमच्यातला प्रत्येक जन एकच प्रार्थना करत होता कि त्या बाटलीच तोंड त्याच्या समोर येवू नये इतकच ... पण त्या बाटलीनेही सगळ्यांची गुपित फोडायचं ठरवलच होत कि काय अस वाटत होत ... त्या खेळात माझा प्रत्येक मित्र मला अजून जास्त चांगल्या पद्धतीने कळत होता , गुपितांचे रहस्य फोडताना त्या मागची त्याची किंवा तिची स्थिती , विचार काय होता ते कळत होत ... मनात साठवून ठेवलेल्या आठवणी, भाव अगदी नकळत ओठांवर येत होते कि काय अस वाटत होत , थोड इमोशनल करणारे तर कधी दिलखुलास हसवणारे किस्से ऐकून आणि सांगून मनातून फ्री झाल्यासारखं वाटत होत ... आणि समोरचे ऐकणारे हि तितक्याच मनपूर्वक ऐकून घेणारे असले ना तर स्वर्ग गाठावा असच भासत . सगळ्यांची गुपित फोडून आम्ही पुन्हा आमच्या हॉटेल च्या दिशेने निघालो ..  

              पण येताना जे भाव विचार होते ना आमच्या मनात ते आता थोडे बदललेले होते , कॉलेज च हे आमच शेवटच वर्ष होत ह्यानंतर आही सारे वेगळ्या-वेगळ्या वाटेने जाणार होतो .. त्याची हूर-हूर मनात वाढायला लागली होती ... रोज भेटणारे चेहरे काही दिवसांनी धूसर होणार होते ह्याची जाणीव सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागली होती ... हळूच का होईना प्रत्येकजण डोळ्याचा काठ अलगदपणे पुसत होता ... अस वाटत होत कि आयुष्यभर ह्या रस्त्यावर असच चालत रहाव थांबूच नये कुठहि, बहुतेक हि माझ्या एकट्याच्या मनातली भावना नसेल, सगळ्यांच्या मनातहि हेच चालू असाव त्याक्षणी पण कुणी बोलून दाखवत नव्हत इतकच ...

         आजकल रोज जरी आमची गाठ भेट होत नसली तरी त्या म्हैसूर च्या रस्त्यावर माझ्या सोबत चालणारी ती मित्रांची फौज आणि आणि त्यांच्या आठवणी आजही मनात तितक्याच गडद आहे.

                                                                                                              - प्रफुल्ल शेंडगे 
 
 

2 comments:

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-