मन मौजी

मन हे मुक्त असत . त्याला जस हव तस ते वागत असत . फुलपाखराप्रमाणे उडत असत . कधी ह्या विचारात अडकून राहत तर दुसर्याच क्षणी दुसर्याच विषयात बुडायला लागत . आपल मन कधी आपल्या ताब्यात नसतच , आपण आपल्या मनाप्रमाने वागतो अस आपण कायम बोलत असलो तरी किती तरी वेळा आपण आपल्याच मनाला मुरड घालत जगत असतो .

किती वाटत असल कि शांत बसून राहावं , स्वतात रमून जाव ,उगाच एकांतात चालत राहाव ,पुस्तक छातीशी कवटाळून डोळे बंद करून खिडकित बसाव , कधी वर टेकडीवर जावून एका झाडाच्या सावलीत निवांत बसाव , त्या टेकडीवरून संपूर्ण शहराला ठेंगण पाहाव , कधी समुद्र किनारच्या वाळूत बसून सूर्यास्त डोळ्यात साठवून घ्यावा , अगदी चांदण्या पाण्यात पडेपर्यंत बघत रहाव , रस्त्यावर चालताना एखाद आवडीच गान कानावर पडल कि वाटत सरळ नाचाव , जोरात गान गाव , स्वताशीच बडबडत राहाव, लहान मुलांसोबत त्यांच्या सारख लहान होवून खेळत राहाव, बालिशपने मित्रांच्या खोड्या काढाव्यात  . अस खूप काही वेगवेगळ करावास वाटत राहत पण बघणारे काय म्हणतील , "वेडा झालाय का ? " अस बोलले तर ? , "त्यापेक्षा नकोच " अस म्हणत आपण ते करण टाळतो .बहुतेक ज्या गोष्टी आपल्याला कराव्याश्या वाटतात पण करता येत नाही त्याला आपल्याच मनातली भीती कारणीभूत असते , कोण काय बोलेल ? , होईल कि नाही? , अस केल तर काय होईल ? अस आपणच स्वताला घाबरवायला लागतो आणि जे आपण म्हणत असतो ना "मनमौजी जगन " ते कुठ तरी दूर पडायला लागत . 


मान्य आहे सगळ्याच गोष्टी जमतीलच अस नाही पण अगदी तसच नाही तरी पण थोड बहुत मनाला आणि स्वताला समाधान वाटेल अस करायला काय जातय?  , अर्थात ज्याचा बाकी कुणाला त्रास होणार नसेल तर . पुन्हा कधीतरी करू अस म्हणत राहिलो तर नंतर -नंतर करता करता सगळच राहून जावू नये म्हणून थोडस खरच मनाला वाटत तस मुक्त जगून पाहायला हरकत काय ?

-प्रफुल्ल शेंडगे .

1 comment:

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-