नावात काय आहे ?

                    नावात काय आहे ? अस शेक्सपियर कधी काळी बोलून गेला . पण तेच वाक्य आजही आपण कधीतरी उच्चार्तोच , पण थोड गांभीर्याने विचार करायला लागलो तर आपल्यालाही समजेल कि , नावात काय काय दडलेलं आहे . आता हेच पहा न "नावात काय आहे ?” हे वाक्य बोलणारा हि आपल्याला त्याच्या नावामुळेच कळला नाहीतर कुणाला कधी कळाल असत कोणी हे बोलून ठेवलं आहे ? . प्रत्येकाची प्रथम ओळख हि त्याच्या नावाने होते , जन्म दाखल्या पासून ते शाळेच्या दाखल्या पर्यंत आणि सोशल साईटस च्या प्रोफाईल नावापासून ते मृत्यू च्या दाखल्या पर्यंत सगळीकडे नाव म्हत्वाच आहेच , आपल नाव सगळ्यानाच प्रिय असत , कुणी तुमच नाव चुकीच उच्चारलं किंवा लिहल तर चढतो ना पार तुमचा काही अंशी वरती , कुणी घेतलं नाव ओठी अगदी प्रेमाने तर वाटत न मन प्रसन्न हीच तर गम्मत आहे ना नावाची .
                           पण समजा जर नाव हि गोष्टच अस्तित्वात नसती तर किती गोंधळ उडाला असता , कुणाला- कस ओळखायच, संबोधायच फारच कठीण होवून झालं असत , महत्वाच म्हणजे "नाव कमावण्याच्या ” ह्या शर्यतीत कुणी उतरलच नसत , आणि लग्नानंतरच्या "उखाण्यात नाव " घेण्याची गोंडस प्रथा हि अनुभवायला मिळाली नसती ,मला वाटतय जर "नाव" हि संकल्पना नसती तर ह्याचा जास्त फटका बॉलीवुड वाल्यानाबसला असता ,नाहीतर अमिताभ बच्चन - त्याच्या हिरोईन ला "माय नेम इस अंथोनी ” अशी ओळख करून देवू शकला असता का? , शाहरुख च्या त्या "राहुल ,नाम तो सुना हि होगा ” ह्या डायलॉग वर शिट्ट्या वाजल्याच नसत्या,आणि "नाम बडे ओर दर्शन छोटे "ह्या गाण्यावर भगवान दादा थिरकलेले पाहता आले असते का ? 
                          पण एक मात्र बर झालं 'शेक्सपियर च वाक्य जास्त मनावर न घेता नावावर बंदी नाही आणली ते, शेवटी नावात काय आहे ? हे सांगता येणार नसल तरी "नावात खूप काही आहे ” हे मात्र नक्की !
                                                                                                               -- प्रफुल्ल शेंडगे .

No comments:

Post a Comment

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-