भारत माझा देश आहे .

                   शाळेतल्या दिवसात प्रार्थनेच्या वेळी आपण एक प्रतिज्ञा बोलायचो, आठवते का ती प्रतिज्ञा ?, हो ! अगदी बरोबर "भारत माझा देश आहे.... ” , ह्याच प्रतिज्ञे वर आधारित मराठी मध्ये एक धडा होता "भारत माझा देश आहे ” नावाचा , कितव्या इयत्तेत होता ते मात्र मला काही नीटस आठवत नाही , पण त्यात लेखकाने एक छान विचार मांडला होता , का “भारत माझा देश आहे ” अस लिहल आहे प्रतिज्ञेत का नाही लिहल गेल कि "भारत आपला देश आहे ”, कारण आपण स्वतच्या गोष्टीना "माझा /माझी ” अस संबोधतो आणि सर्वांच्या गोष्टीना "आपला / आपली ” अस म्हणतो , आणि स्वतच्या गोष्टीना जेवढ आपुलकीने , प्रेमाने , काळजीने जपतो , सांभाळतो तेवढ आपण "आपल्या ” गोष्टीना सांभाळत नाही, कारण ती सर्वांची असते ना , आपण हा विचार करतो कि , 'मीच का लक्ष देवू , देयील न कुणीतरी लक्ष, घेयील कुणीतरी काळजी ' मात्र प्रत्येक जन हाच विचार करत बसतो आणि सगळ्याचंच दुर्लक्ष होत .....

                  पण शाळा संपली तसं आपण हि "प्रतिज्ञा ” विसरलो आणि भारत माझा देश आहे हे हि विसरून गेलो , आता आपल्या इथला प्रत्येक जन दुसरा देश आपल्या भारता पेक्षा कसा चांगला ह्याबद्दलच बोलत असतो , 'त्या ' देशातली स्वच्छता पहिली ? , "काय शिस्त आहे यार तकडे ", "आपल्या भारतात काहीच होवू शकणार नाही ", दुसर्या देशात गेल्यावर तिथले नियम , कायदे अगदी बरोबर पाळता न तुम्ही ?, आपल्या देशातही तेच आणि तसेच कायदे -नियम आहेत पण आपल्याला ते गळ्यातला दोरखंड वाटायला लागतात आणि येता- जाता तो कापायचा आपला प्रयत्न चालू असतो , दुसर काही नाही?
                 माझ म्हणन अस नाही कि ,तुम्ही दुसर्या देशाबद्दल चांगल बोलू नका अस , बोला ना दुसर्या देशाबद्दल चांगल , खरच असेल तो देश आपल्या पेक्षा पुढे , पण विचार करा "का आहे तो देश आपल्या पुढे ?” कारण तिथली मानस , तिथले नागरिक स्वतःच्या (फ़्क़्त स्वतःच्या ) प्रगतीकडे न पाहता देशाची प्रगती कशी होईल ह्याचा विचार करतात , आणि आपण फ़्क़्त नाव ठेवण्यात आपला वेळ घालवतो , तसं कधी आपण आपल्या देशाविषयी कधीच चांगल बोलत नाही अस नाही , बोलतो कि आपण हि आपल्या देशाबद्दल चांगल , पण कधी माहिती आहे का ? वर्षातले फ़्क़्त 2 दिवस ! आपण आपल्या देशाच गुणगान गातो ते म्हणजे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी , आणि वाटतो अभिमान देशाचा जेव्हा "भारत ” जिंकतो एखादी क्रिकेट मैच तेव्हा ....कुणी एकाने मस्त वाक्य बोलून ठेवल आहे
                      आजकाल देशभक्ती सिर्फ तारीखो पे आती है , और चली जाती है ”

आपण का विसरतो , कि आपण म्हणजेच "देश ” आहोत , देशातली हि करोडो जनता म्हणजे भारत आहे , का वाट पाहतोय आपण आज हि कुणी तरी सुरुवात करायची ?, उचला ना तुम्ही पाहिलं पाऊल , करा ना प्रतिनिधित्व , किती दिवस गर्दीतला एक सामान्य चेहरा बनून राहनार ? , करा दुसर्या देशातल्या चांगल्या गोष्टींच अनुकरण , ते जी स्वच्छता , शिस्त, देशप्रेम बाळगतात , बाळगा न ते हि तुमच्या अंगी , आणि घडवा आपला हि देश त्यांच्या देशासारखा , ज्याचा तुम्हाला ,स्वताला दरदिवशी अभिमान वाटेल , आणि बाकी सारया जगाला हि आपल्या देशाच कौतुक वाटाव असा ..... आणि त्यासाठी सतत जागृत ठेवा एक विचार कि "भारत माझा देश आहे  ”.

                                                                                                  -- प्रफुल्ल शेंडगे .

No comments:

Post a Comment

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-